Maharashtra Corona Update : आज 8,232 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 91.71 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या 24 तासांत 8 हजार 232 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 15 लाख 77 हजार 322 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 91.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मागील 24 तासांत 5 हजार 92 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 19 हजार 858 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 96 हजार 372 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 110 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 45 हजार 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.63 टक्के आहे. सध्या पुण्यात (17,279), मुंबईत (17,603), ठाण्यात (14,980) सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आतापर्यंत 94 लाख 40 हजार 535 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 17 लाख 19 हजार 858 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 10 लाख 51 हजार 221 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 912 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.