Maharshtra News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग

एमपीसी न्यूज- सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा (Maharshtra News) काढायला तयार नाही.तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळेअध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

Pune News – व्हायोलिन वरील संत रचनांच्या सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

 

 

गारपीटीने 8 शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल. शेतकरी अडचणीत आले आहेत.  सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना, सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी 75 टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्‍यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार ,असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

 

 

 

काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास (Maharshtra News) आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.