Maval : राज्याच्या विकासात मावळचे योगदान महत्त्वाचे – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – राज्याच्या विकासात मावळ तालुक्याने (Maval) जेवढे योगदान दिले, तेवढे कोणी दिले नाही. मावळातील शेतकऱ्यांचा त्याग लक्षात घेता मावळ हे ख-या अर्थाने राज्याचे विकासाचे केंद्र आहे असे म्हणणे सार्थ ठरेल. 10 धरणे, 4 एमआयडीसी, 2 राष्ट्रीय महामार्ग, सरंक्षण खात्याचे डेपो, मिसाईल प्रकल्प अशा विकास कामांसाठी मावळातील शेतकऱ्यांनी जमीनी देऊन त्याग केला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विधानभवनातील 288 आमदारांपैकी उत्कृष्ट काम करणा-यां पहिल्या पाच आमदारांच्या यादीमध्ये बाळा भेगडे यांचे नाव होते, असे गौरवोद्गार बावनकुळे यांनी काढले.

आंबी मावळ येथे शिरे-शेटेवाडी ह्या गावांच्या पुनर्वसन भूखंडाचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे होते. याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार विक्रांत पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मावळ शिवसेना अध्यक्ष राजेश खांडभोर,पोटोबा महाराज देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे,गुलाबराव म्हाळसकर, जि प सदस्य नितीन मराठे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,महिला अध्यक्षा सायली बोत्रे,सुमित्रा जाधव,कल्याणी ठाकर सह सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे-फडणवीस हे सरकार गोरगरीबांचे,महिलांचे व शेतक-यांचे असल्याने शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी अतिमहत्त्वाचे निर्णय ह्या सरकारने घेतले आहेत.विकासाची गती तळागाळापर्यंत पोहचविण्याचा निर्धार ह्या सरकारचा आहे. दुहेरी इंजिन असल्यामुळे राज्याचा विकास गतिने होत आहे आणि मोदींचे आत्मनिर्भर भारत बनण्याचे स्वप्न 2035 पर्यंत साकार होईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, अडीचे वर्षाचे निष्क्रिय सरकार गेल्यानंतर आपल्या विचारांचे, हक्काचे सक्षम सरकार आल्याने शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बाळा भेगडे म्हणाले की,कै दिगंबर दादा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली 23 वर्षे लढा दिला व आज शिरे- शेटेवाडी पुनर्वसनातील भूखंडाचे वाटप होत आहे. ख-या अर्थाने हा लढा आज संपला असून मनस्वी आनंद होत आहे.

Pune : ताम्रपटांच्या संशोधनातून भारताच्या इतिहासातील नवीन पैलू उलगडतात – डॉ. श्रीनंद बापट

यावेळी कै आमदार दिगंबर भेगडे यांच्या कुटुंबियांचा सत्कार तसेच ह्या संघर्ष लढ्यात योगदान दिलेले शांताराम कदम, मधुकर धामणकर तसेच माजी सरपंच मीराबाई वारिंगे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
110 लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन गुंठेचा 7/12 उतारा व ताबा (Maval) पावती देण्यात आली.

सर्व लाभार्थ्यांच्या वतीने मधुकर धामणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम यांनी केले. सूत्रसंचालन गणेश कल्हाटकर, संदेश शेलार यांनी केले तर आभार वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.