Pimpri : मोदी, फडणवीस व भाजपाने देशाची माफी मागावी – सचिन साठे
साठे पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर व्हावे यासाठी अयोध्येत जाऊन केलेली मागणी व गंगाआरती हा केवळ दिखावा आहे. मागील साडेचार वर्षात भाजपा सेनेने कधीही रामाचे व राममंदिराचे नाव घेतलेले नागरीकांना आठवत नाही. आता निवडणूका आल्या की, युती सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारच्या नाकर्तेपणाकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच उध्दव ठाकरेंना आता रामाचा व विठ्ठलाचा आसरा घेण्याची वेळ आली आहे. मागील साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेची ‘देवेंद्र नागपूरकर सह उध्दव मुंबईकर यांच्या बहुरंगी, बहुढंगी लोकनाट्यामुळे’ फसवणूक झाली आहे. उध्दव सेनेने युतीची आम्हाला गरज नाही अशा वल्गना करायच्या आणि मुख्यमंत्र्यांनी युती होणारच असे वगनाट्य सादर करायचे. या वगनाट्यामुळे नागरीकांचे फक्त मनोरंजन झाले.