Akurdi: भूमीपुत्रांनी मराठवाड्याच्या विकासासाठी योगदान द्यावे – चंदन पाटील

एमपीसी न्यूज – महिला सक्षमीकरण, मराठवाड्यातून होत असलेले स्थलांतर, यशस्वी युवा उद्योजक वाढविणे, महाविद्यालयीन विद्यार्थी  विकास आणि शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवड स्थित मराठवाडावासीयांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भारतीय किसान संघाचे चंदन पाटील यांनी केले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय किसान संघ प्रणित सावड मंचच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीचे आकुर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, निवृत्त कृषी उपसंचालक पांडुरंग सिगेदार, कृषीतज्ज्ञ दिलीप बारडकर, सावड मंचाचे मराठवाडा समन्वयक शशिकांत गव्हाणे, सूर्यकांत कुरुलकर, शिवाजी डोंगरे, शंकर तांबे, राजेंद्र गाडेकर, श्रमिक गोजमगुंडे, वसंत आंग्रे, अमोल लोंढे, सुनील काकडे, प्रशांत फड, अनिल व्यास, धनाजी येळकर, किशोर अटरगेकर, गोरख भोरे, मारोती आवरगंड, बाबासाहेब सुकाळे उपस्थित होते.

 

पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडावासीय बांधव एकत्र येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मराठवाड्यातील समस्यांवर आपआपल्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनी एका मंचावर एकत्रित येण्याची गरज होती, असे पवार म्हणाले. नितीन चिलवंत यांनी महाराष्ट्र दिन आणि मराठवाड्याचे योगदान यावर मार्गदर्शन केले. तर, दिलीप बारडकर यांनी मराठवाड्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. शशिकांत गव्हाणे यांनी सावडची मराठवाड्यातील रचना सर्वांना समजून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कुलकर्णी यांनी केले. तर अनिल व्यास यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.