Mumbai: Breaking News! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय
Coronavirus Lockdown: While the lockdown has been extended for the whole of Maharashtra, an order on phase-wise lifting or relaxation of the curbs will be notified soon.
एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश राज्य शासनाचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी जारी केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्वीटद्वारे या आदेशाची प्रत प्रसारित केली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 3.0 आज संपत आहे. लॉकडाऊन 4.0 असणार आहे, मात्र त्यांचे स्वरूप वेगळे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले होते.
केंद्र शासनाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच राज्य शासनाने लॉकडाऊनची मुदत वाढविल्याचा आदेश काढला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नवीन लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक सूचना थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. नव्या लॉकडाूनचे नियम काय असणार आहेत, याबाबत राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र उत्सुकता आहे.
🚨Update🚨
Lockdown extension in the entire State of Maharashtra till midnight of 31st May 2020 pic.twitter.com/4D2lDzxGRO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 17, 2020