Mumbai : मित्राने सोडले, पण ज्यांच्या विरोधात 30 वर्षे सामना केला त्यांनी विश्वास ठेवला – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज- तीस वर्ष ज्यांची साथ केली त्या मित्राने विश्वास ठेवला नाही पण या काळामध्ये त्यांच्याशी सामना केला त्या विरोधकांनी मात्र माझ्यावर विश्वास ठेवला असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर काढले.

शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असल्याचे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली नाही. खोटे बोलणे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या बसत नाही. जे ठरले होते तेच मागितले. पण तुम्ही मातोश्री बाहेर पडल्यावर खोटे बोललात” असे म्हणत ठाकरे यांनी यांनी भाजपवर निशाणा साधला.

राज्यातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना आपले वाटेल अशीच या सरकारची वाटचाल असणार आहे. अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. नवे सरकार सूडबुद्धीने वागणार नाही पण कुणी आडवे आले तर त्याला सोडणार नाही असेही ठणकावून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.