Mumbai: हिरानंदानी रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

मुंबईत फिलिपाईन्सचा नागरिक असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्यातील कोरोनाचा हा तिसरा बळी असल्याचे सांगितले जात होते.

या संदर्भात टोपे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रविवारी रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला.त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.