Mumbai : ‘मी गेली बावीस वर्षे लॉकडाऊनमध्येच’…

एमपीसी न्यूज : ‘तानाजी, द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून एक लाडकं बॉलिवूड कपल अनेक वर्षांनंतर परत एकदा पडद्यावर झळकलं. अजय देवगण आणि काजोल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात भूमिकादेखील साकारल्या. काजोलने यात तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई साकारली तर अजयने तानाजी मालुसरे साकारले. अलीकडेच अजयने एक मजेशीर ट्विट शेअर केलं आहे. यात त्याने त्यांच्या लग्नाची तुलना लॉकडाउनसोबत केली आहे.

९०च्या दशकापासून आयुष्याच्या प्रत्येक पावलावर एकमेकांची साथ देणाऱ्या या जोडीमध्ये कधीही कुरबूर झाल्याचं ऐकिवात नाही. बिनधास्त, फटकळ काजोल आणि शांत, समंजस अजय यांना न्यासा आणि युग ही दोन गोड मुले देखील आहेत.

न्यासा आता चित्रपटात पदार्पण करण्यासाठी तयारी करत असल्याची अंदर की बात आहे. लग्नाला २२ वर्षे झाली तरी या जोडीमधलं प्रेम कायम पाहायला मिळतं. मात्र, हे दोघं एकमेकांवर जितकं प्रेम करतात तितकीच एकमेकांची मस्करीही करतात.

अलीकडेच अजयने एक मजेशीर ट्विट शेअर केलं आहे. यात त्याने त्यांच्या लग्नाची तुलना लॉकडाउनसोबत केली आहे.

‘मला असं वाटतंय मी गेल्या २२ वर्षांपासून लॉकडाउनमध्येच आहे’, असं ट्विट अजयने केलं आहे. अजयने मजेशीर अंदाजात हे ट्विट केल्यामुळे अनेकांच लक्ष वेधलं गेलं आहे.

मात्र, हा सारा मस्करीचा भाग असून अजयचं काजोलवर अतोनात प्रेम असून तो कायम तिचा आदर करत असल्याचं पाहायला मिळतं.

सध्या लॉकडाउन असल्यामुळे सारं काही बंद असून प्रत्येकालाच सक्तीने घरात बसावं लागत आहे. त्यामुळेच अजयने त्याच्या लग्नाची तुलना लॉकडाउनशी केली आहे. त्याने ट्विटरवर काजोलसोबतचा एक फोटो शेअर करत मी लॉकडाउनमध्ये असल्याचं म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.