Mumbai News : तुम्ही दिवास्वप्न रंगवा ; महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करेल : संजय राऊत

एमपीसी न्यूज : भाजपाचे नेते येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील सरकार कोसळणार असून भाजपचे सरकार येईल, अशा वल्गना करत आहेत. देशातील सर्वात स्थिर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आहे. तुम्ही दिवास्वप्न रंगवा, महाविकास आघाडीचे एक वर्ष पूर्ण झाले असून उर्वरीत चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार राऊत म्हणाले, पहाटे शपथविदी झालेल्या तीन दिवसांपुर्वी तीन दिवसीय सत्तेची जयंती होती आज त्याची पुण्यतिथी आहे. महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे. तरीही भाजपाचे काही नेते सारखे बरळतात की दोन महिन्यात सरकार पडेल, तीन महिन्यात भाजपाची सत्ता येईल. भाजपाच्या सर्व नेत्यांनो दिवास्वप्न रंगवत बसा, महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ विनासायास पूर्ण करेल. त्यातील एक वर्ष पूर्ण झालयं चार वर्षे देखील पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.