Mumbai: विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करणार – उदय सामंत

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र, येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील परीक्षा बाबतचे वेळापत्रक जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) नेमलेल्या दोन समितींने याबाबत काही शिफारसी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिलेल्या गाईडलाइन्स या राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रमाणे एफवाय आणि एसवायच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेण्यात याव्यता. शिवाय 12 वी निकाल लागल्यानंतर प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन 1 सप्टेंबर पर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू कराव्यात, अशा सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत.

त्यानुसार आता उद्या आणि परवा तंत्र शिक्षण विभागाचे संचालक आणि राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू या गाईडलाइन्स नुसार राज्यातील विद्यापीठासाठीचे अंतिम वेळापत्रक 2 ते 3 दिवसात ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितले. हे वेळापत्रक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील परीक्षा बाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सामंत म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.