Pune : राहुल गांधींसह काँग्रेस रणांगणामधून पळून गेली – रावसाहेब दानवे
एमपीसी न्यूज – देशातील परिवार पार्टीला (काँग्रेस) 100 वर्षाहून अधिक काळाचा पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आता अध्यक्ष राहिला नसून अध्यक्षपद कोणीही घेण्यास तयार नाही. लोकसभेतील पराभव लक्षात घेता काँग्रेस पक्षाने बांधणी करण्याची आवश्यकता असताना राहुल गांधींसह काँग्रेस रणांगणामधून पळून गेली आहे, अशा शब्दात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान शुभारंभाचा कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.