Nigadi : श्रावणी काव्य स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन
नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाच्या वतीने आयोजन
एमपीसी न्यूज – नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळातर्फे २७ व्या श्रावणी काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी कवींनी आपल्या दोन कविता नाव, फोन नंबर आणि पत्यासह दि. १५ जुलै २०१९ पर्यंत, खालील पत्यावर पाठवाव्यात.
- स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धेच्या काव्याला विषयाचे व काव्यप्रकाराचे बंधन नाही. कवींनी आपल्या कविता पुढील पत्त्यावर पाठवून द्याव्यात असे आवाहन केले आहे.
संपर्कासाठी पत्ता – सचिव माधुरी ओक ४६/१, एल.आय.जी. कॅालनी, सेक्टर २५, सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी, पुणे. ४११०४४.