Nigdi : नळजोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांकडून दोन महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज- नळ जोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांनी दोन महिलांना मारहाण केली. तसेच एका महिलेचा विनयभंगही केला. ही घटना ओटास्कीम, निगडी परिसरात घडली.

या प्रकरणी राजू केरप्पा गायकवाड, चेतन राजू गायकवाड आणि मंथन राजू गायकडवाड (सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 8) फिर्याद दिली आहे.

एक महिन्यांपूर्वी आरोपी राजू गायकवाड याने फिर्यादी महिलेचा हात पकडून विनयभंग केला. तसेच मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास नळ जोडणी घेण्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भांडण झाले. त्यावेळी फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी मारहाण केली. फिर्यादी या सोडविण्यासाठी आल्या असता चेतन गायकवाड याने हातावर तलवारीने वार केला. त्यावेळी शेजारी बसलेल्या एका महिलेला आरोपी राजू गायकवाड याने दगड मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी मंथन याने फोनवरून तसेच समक्ष फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.