Pune : महिलेला त्रास दिल्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – महिलेला त्रास दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना 24 एप्रिल रोजी खराडी गावठाण येथे पहाटे सव्वापाच ते पावणेसहाच्या सुमारास घडली. याप्रकणी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

अर्जुन लामीछाने (वय 35, रा. चिसपाणी, नवलपूर, लुमिनी नेपाळ), असे मयत तरुणाचे नाव असून राजेश ईश्वर जाधव (वय 45), रमेश बालाजी टक्के (वय 29), बाबुराव कानीराम राठोड (वय 40 तिघेही रा. खराडी गावठाण), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अर्जुन याने परिसरातील एका महिलेला पाणी मागून त्रास दिला. याबाबत आरोपी जाधव याने त्याला विचारणा केली असता त्यालाही दगडाने मारहाण केली. तर आरोपी बाबुराव राठोड याच्या पत्नीचा हात धरला. याचा राग धरून आरोपी जाधव, राठोड आणि टक्के या तिघांनी मयत अर्जुन याला लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अर्जुन याचा मृत्यू झाला.याप्रकरणी आप्पासाहेब गणपती मोरे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वराळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.