Pune News: सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं : शरद पवार
एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील महाविकास सरकारने एकत्र काम केले त्यांचे हे यश आहे. पुणे, नागपूर मतदार संघात ही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना पुण्यात दिली.
पवार पुढे म्हणाले, धुळे-नंदुरबारचा निर्णय हा काय अजिबात आश्चर्यकारक नाही. अमरीश पटेल निर्वाचित होते त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वी होता. त्यामुळे भाजपाचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. गेले वर्षभर काम करून दाखवलं आहे. त्यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली हा महाराष्ट्राचा निकाल चित्र बदलत असल्याचे दर्शवित आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधानपरिषदेला ते कसे निवडून आले, ते सर्वांना माहित आहेच. त्यामुळे त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.