Osmanabad News : नुकसानीच्या पाहणीसाठी संभाजी राजे ट्रॅक्टर आणि चिखलातून थेट शेतात

शेतकऱ्यांनी मांडल्या राजेंपुढे व्यथा

एमपीसी न्यूज – तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आले होते. अन्नधान्य वाहुन गेले खायचं काय? द्राक्षबागा, कांदा गेला वाहून, आता करायच काय?  जमिनी खंगाळून गेल्या, जगायचे कसे, या प्रश्नांसह अनेक शेतकऱ्यांनी संभाजी राजे यांच्या समोर व्यथा मांडल्या. यावेळी संभाजी राजे यांनी थेट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यात आपसिंगा येथे तर शेतात जाण्यासाठी रस्त नव्हता तिथे दीड किलोमीटर टॅक्टरमधून नंतर चिखलातून शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली पाहणीनंतर बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून यात छत्रपती संस्थानच्या जमिनींनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

छत्रपतींना नुकसान भरपाई नको, पण उर्वरीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, मदतीबाबत मी केंद्राला बोलतो , गोरगरीब शेतकऱ्यांना मात्र मदत गरजेची असल्याने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी मी शासनाकडे करणार असल्याचे स्पष्ट केले.

सकाळी 8:30 वाजता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून पाहणीस आरंभ केला. नंतर सिंदफळ येथे आले असता एका महिलेने अन्नधान्य वाहून गेले घर पडायला झाले आता खायला काही नाही,  असे सांगताच प्रशासनाला सांगून तुम्हाला अन्नधान्य देण्याची व्यवस्था करतो, असे सांगून संबंधित महिलेला धीर दिला.

तर आपसिंगा येथे शेतकरी युवराज पाटील यांच्या शेतात टॅक्टरमधून जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक बागायतदार शेतकऱ्यांनी रडकुंडीला येऊन आमच्या द्राक्षबागा गेल्या, कांदा गेला, आमचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले तसेच अनेक गावात जावून नुकसानीची पाहणी केली. यावेळी रोहित पडवळ, सुजित जमदाडे, शरद जमदाडे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.