Osmanabad News : उद्धव ठाकरे आश्वासन विसरल्याने त्यांची अवस्था गजनीतील अमीर खानसारखी

माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची पत्रकार परिषदेत टीका

एमपीसी न्यूज – सत्तेत नसताना उद्धव ठाकरे यांनी बागायतदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये तर कोरडवाहू शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांची मदत देऊ असे अश्वासन दिले होते. मात्र आता उद्धव ठाकरे सत्तेत आल्यानंतर ते हे आश्वासनाचा विसरून गेले आहेत, यावरून त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाल्याची टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.

ते गुरुवारी उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याचे केवळ पंचनामे करण्याची गरज नसून बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहेत.

केंद्राने पारित केलेल्या कृषी विषयक कायद्यासंदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच राज्य सरकारला लक्ष करत फटकेबाजी केली. अद्याप सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सध्याचे मंत्री हे ‘स्वतःचे कुटुंब; स्वतःची जबाबदारी’ सांभाळत असून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या मंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे,, असे बोंडे म्हणाले.

आकासातून ‘जलयुक्त शिवार’ची चौकशी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकल्पाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

हा प्रकार बदल्याच्या भावनेतून सुरू असल्याची टीका बोंडे यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीला मी स्वतः महाराष्ट्र भर फिरून हजर राहीन तसेच एसआयटीला सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.