PCNTDA : साडेबारा टक्के जमीन भूखंड परताव्यात एजंट, बिल्डरांकडून शेतकऱ्यांची फसवणूक?, सीआयडी चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNTDA) साडेबारा टक्के जमीन भूखंड परताव्यात एजंट व बिल्डरांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे इमेलद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात काळभोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येणार म्हणून जाहीर होण्यापूर्वी शहरातील शेतकरी बांधवांच्या जमीनी बिल्डर व एजंटांनी आर्थिक देवाण घेवाण करुन संबंधित जमीन साठेखत करून शेतकरी बांधवांच्या फसवणूकीचे प्रकार गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शेतकरी बांधवांना धमकी देऊन जमीन भूखंड साठे खत करून खरेदी विक्री व्यवहार करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात अत्यंत तातडीने शासनाने सीआयडी चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी.

Pune : पुण्यातील तरुणांनी थर्टी फस्ट पार्टी करून नाही, तर पोलिसांना चहा देऊन केला साजरा

शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा (PCNTDA) देण्यात यावा. अटी-शर्ती नियमानुसार 25 वर्ष सदर जागा खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही. अशी अट घातली जावी. जेणेकरून शेतकरी बांधवांना किंवा त्यांच्या वारसांना जमीन भूखंड परतावा फायदा होईल. जमीन भूखंड बिल्डर व एजंट यांच्या घशात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. करोडो रुपये किमतीच्या जमीनी कवडीमोल भावाने बिल्डर व एजंट राजकीय नेते मंडळींनी शेतकरी बांधवांवर दबाव तंत्राचा वापर करून लुटण्याचा प्रकार घडला आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देताना ती जमीन 25 वर्षे विकता येणार नाही, अशी अट घालावी. त्यामुळे ती जमीन बांधकाम व्यावसायिकांच्या घश्यात जाणारी नाही, अशा मागणी काळभोर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.