Pimpri : ‘रामायणा’नंतर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मराठी मालिका आजपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज – देशभरात लाॅकडाऊन लागू केल्यामुळे सर्व ठिकाणी लोक घरात अडकून पडले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनोरंजनासाठी केंद्रीय माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयातर्फे ‘रामायण’ या 90 च्या दशकात गाजलेल्या मालिकेचे दूरदर्शनवर पुन्हा प्रक्षेपण सुरू करण्यात आले. त्यानंतर आता लोकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रात तुफान गाजलेली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका आजपासून (दि.30) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेचे प्रक्षेपण ‘झी’ मराठी या वाहिनीवरून आज (दि.30) पासून सोमवार ते शनिवार या दरम्यान दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत होणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.