Pimpri : बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था तातडीने सुरु करणार – दिलीप वळसे-पाटील
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप साऱ्या गोरगरीब बांधकाम कामगारांची जेवणाची गैरसोय होत आहे. तसेच बहुतांश बांधकाम कामगार हे विविध जिल्ह्यांतील वा परराज्यातील असल्याने व वाहतूक व्यवस्थेअभावी त्यांना गावी जाता येत नसल्याने अशा नोंदीत व अनोंदीत कामगारांची नोंदणीस अधीन राहून मध्यान्ह भोजना व्यवस्था तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
बांधकाम कामगारांची जेवणाची गैरसोय होत असल्याने हा निर्णय तातडीने घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ट्विटरवरून देण्यात आली. या निर्णयाने राज्यभरातील बांधकाम कामगारांना दिलासा मिळाला आहे.
बहुतांश बांधकाम कामगार हे विविध जिल्ह्यांतील वा परराज्यातील असल्याने व वाहतूक व्यवस्थेअभावी त्यांना गावी जाता येत नसल्याने अशा नोंदीत व अनोंदीत कामगारांची नोंदणीस अधीन राहून मध्यान्ह भोजना व्यवस्था तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ना. @Dwalsepatil यांनी दिली. pic.twitter.com/jyfH2xBlrM
— NCP (@NCPspeaks) March 30, 2020