Pimpri : शहरात स्थायिक असलेल्या कामगारांचीच भरती करा ; नगरसेवक राहुल कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या मानधनावर कामगारांची भरती केली जात आहे. दिवसेंदिवस शहरात बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगार हा पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेलाच पाहिजे.  अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे.  

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागामध्ये मानधनावर कामगारांची भरती चालू आहे. दिवसेंदिवस शहरात बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्राधान्याने पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या कामगारांची भरती करण्यात यावी. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना काम मिळेल.

महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे रहिवासी म्हणून स्थानिक नागरिक कर भरतो. त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगार हा पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेलाच पाहिजे.  यापुढे मानधनावर करण्यात येणाऱ्या कामगार भरतीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या कामगारांना संधी द्यावी तसेच महापालिकेच्या विविध विभागात असलेल्या रिक्त जागा देखील लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.