Pimpri : पिंपरी कॅम्प, भाटनगर परिसरात 18 तासांपासून लाईट गूल; ग्राहक संतप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प आणि भाटनगर परिसरात गेली 18 तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला असून अद्याप तो पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काल रात्री वीज पुरवठा अचानक खंडीत झाला आणि अठरा तास उलटून गेले तरी महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

याबाबत अधिकची माहिती घेतली असता समजले कि, वीजेची एक लाईन पंक्चर झाली असून ती पूर्ववत करण्यासाठी वेळ लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अजून एक ते दोन तासांचा अवधी लागू शकतो, असे सांगितले. महावितरणकडून होणाऱ्या दिरंगाई बद्दल परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.