Pimpri : पार्थच्या पराभवाचा धक्का नाही; पराभवाने तो खचला नाही – अजित पवार
एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलगा पार्थ याच्या पराभवाचा पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पडलेल्या उमेदवाराच्या पराभवाचे जेवढे दुःख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दुःख झाल्याचे पार्थचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच पार्थ पराभवाने खचला नसल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) पवार प्रथमच जाहीर कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच शहरात आल्यावर पार्थच्या पराभवावर भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून राहतो. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांचे दुःख वाटले. तेवढेच दुःख मुलगा पार्थ याच्या पराभवाचे झाले आहे. पक्षाच्या इतर उमेदवारांच्या पराभवा सारखाच त्याचा पराभव झाला आहे. पराभवाने तो खचला नाही. ज्याला योग्य वाटेल ते त्याने करावे, याचे आमच्यात स्वातंत्र्य आहे.