Pimpri : राज्यातील 19 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी ‘3 टी’ फाॅर्म्युला – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – कोरोना विरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करत आहेत. कोरोना संशयित रूग्णांना क्वारंटाईन करने, पॉझिटिव्ह रूग्णांना आयसोलेट करून उपचार करने आणि हा आजार कम्युनिटी ट्रान्समिशनमधून जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून लाॅकडाऊन सारखा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ‘3 टी’ फाॅर्म्युल्याचा वापर करत आहेत.

ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा तो फाॅर्म्युला आहे. या मध्ये कोरोना संशयित व बाधित रूग्णांचा शोध घेणे व टेस्टींगसाठी पुढे पाठवणे आणि त्यावर योग्य उपचार करने असे या फाॅर्म्युल्याचे स्वरूप असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले. राज्यात आत्तापर्यंत 135 कोरोना बाधित रूग्ण आढळले असून आतापर्यंत 19 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत ही आशादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

टोपे पुढे म्हणाले, काही खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा काळात असंवेदनशील वागणे चांगले नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात रक्तसाठा मर्यादित असल्याने नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वैद्यकीय कर्मचारी व डाॅक्टर कोरोनाशी मुकाबला करत असताना त्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.

राज्य सरकार या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळे प्रयत्न करत असून नागरिकांनी मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार मी कोरोनावर विजय मिळवणार, अशी खूणगाठ मनाशी बांधण्याचे आवाहन टोपे यांनी केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. या परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरीकांना सेवा द्यावी, अशी सूचना करतानाच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहनही टोपे यांनी केले.

 

राज्यात सधया 135 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. आतपर्यंत चार हजार 228 जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या आहेत. त्यापेकी चार हजार 17 चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 135 रिपोर्ट पॉझीटिव्ह आले आहेत. शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.

 

कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू राहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. कोवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळावे.

 

ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे, असे कोरोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत. बाधीत रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.