Pune Crime News: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘तो’ खून अनैतिक संबंधातून, एकाला अटक

मयत अमर क्षीरसागर याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याच महिलेसोबत आरोपी रोहिदास पाटोळे याचेही अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते. याच रागातून रोहिदास याने अमर क्षीरसागर याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवले ब्रिज येथे काही दिवसांपूर्वी पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

अमर क्षीरसागर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी रोहिदास पाटोळे (वय 45) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत अमर याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याच महिलेसोबत आरोपी रोहिदास पाटोळे याचेही अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते. याच रागातून रोहिदास याने अमर क्षीरसागर याचा खून करून मृतदेह हात-पाय बांधून पोत्यात भरला आणि नवले ब्रिज खाली आणून फेकून दिला.

भारती विद्यापीठ पोलिसांना चार दिवसांपूर्वी नवले ब्रिज खाली पोत्यात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला त्याची ओळख पटली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली. आणि मयताची ओळख पटवीत आरोपीला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.