Pune : डॉ. कल्याण गंगवाल म्हणतात, कोरोना व्हायरसने मुक्या प्राण्यांवर केली करुणा!
एमपीसी न्यूज – जगभर सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमधून सुरु झालेला हा आजार आता भारतात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात येऊन पोहोचला आहे. कोरोनाची धास्ती घेत सर्वच गर्दीची ठिकाणे व यात्रा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी प्राण्यांची कत्तल वाचणार असून, लाखो प्राण्यांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे या प्राण्यांवर कोरोना व्हायरसने करुणा केली आहे, असे अजब वक्तव्य सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.
यावेळी डॉ. गंगवाल यांनी शाकाहाराचे महत्व पटवून देत प्राण्यांचा बळी देऊ नये, असे आवाहन केले.