Pune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)
- काही महिन्यांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणारा कालवा फुटल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. त्यावेळी येथील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. या धक्क्यातून सावरले जात असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे मोठे हाल झाले.
लग्नासाठी तयार केलेले साहित्य गेले पाण्यात वाहून
संगीता भरत काशिद यांच्या मुलीच्या लग्नासाठी पै पै जमवून खरेदी केलेले साहित्य पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे काशीद कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. संगीता काशिद म्हणाल्या की, जनता वसाहत मध्ये मागील 25 वर्षापासुन राहत आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमच्या घराच्या खालून गेलेली जलवाहिनी काही समजण्याच्या आत अचानक फुटली. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झाले नाही. बाहेरुन लोकानी दरवाजा तोडल्याने आमची सुटका झाली. अन्यथा माझ्यासह पती, दोन मुली, एक मुलगा आणि भावाच काही खरे नव्हते. आमचा जीव वाचला, पण दोन महिन्यानंतर मुलीचे लग्न आहे. लग्नासाठी कष्ट करून जमवलेले सर्व साहित्य, दागिने पाण्याबरोबर वाहून गेले. माझे पती हमाली करतात आणि मी भाजीविक्री करून एक एक पैसा जमवून खरेदी केली. हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.