Pune : रामभाऊ म्हाळगी शाळेतील 20 ते 22 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा

एमपीसी न्यूज- कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील 20 ते 22 मुलांना दुपारच्या माध्यन्ह शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. आहार खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि इतर त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या शाळेला सेंट्रल किचनच्या द्वारे भोजन पुरविले जाते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.