Pune : आघाडी सोबत गेल्याचा मला पश्चाताप नाही; जनतेचा कौल मान्य – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीदरम्यान आघाडी सोबत गेल्याचा मला पश्चाताप नसून जनतेने दिलेले कौल मान्य आहे, असे जाहीर स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत आघाडी सोबत गेल्यामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले का? या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. तर, यासह राज्यातील अनेक घडामोडीवर त्यांनी भाष्य केले.

  • यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी सोबत ज्याच का नाही? याबाबत राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. मात्र, आमचा केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कायम विरोध असणार आहे. त्याबाबत या पुढील काळात तीव्र लढा उभारला जाणार आहे.

शेतमाल नियमन मुक्त न झाल्यास सदाभाऊ खोत रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहे. त्यावर ते म्हणाले की, शेतमाल नियमन मुक्त करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षापासून शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. ते अगोदर त्यांनी करून दाखवावे. इकडचा पण आणि तिकडचा पण मीच असे दाखवू नका, अशा शब्दात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली.

  • तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर सरकारने उपाय योजना कराव्यात. मात्र, हे सरकार काही करताना दिसत नाही. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.