Pune: हिटलरने जर्मनीत घडवले तेच भारतात घडविण्याचा प्रयत्न : जितेंद्र आव्हाड

CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला

एमपीसी न्यूज – हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न सध्या होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 

CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणलं आहे. त्यामुळे आता आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे आता देशानं ठरवायचं आहे, असेही आव्हाड म्हणाले. NRC विरोधात पुण्यातील सारसबागेच्या शेजारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये आव्हाड यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी जिग्नेश मेवाणी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उपस्थित होते.

इस्लाम खतरेमें है, याऐवजी जेव्हा संविधान खतरेमें है, असे नारे ऐकू येतात तेव्हा हा देश पुन्हा एकजूट होत असल्याची जाणीव होते, असेही आव्हाड यांनी सांगितले.

पोलीस सरकारच्या आदेशानेच चालतात. त्यामुळे भीमा कोरेगाव हिंसाचार घडला, असा आरोपही आव्हाड यांनी केला. इंदिरा गांधी यांच्याबाबत जे काही वक्तव्य केलं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी रक्ताने सेक्युलर आहे. इंदिरा गांधी या महान नेत्या होत्या. त्यांच्याबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.