Pune : मार्केट यार्ड शुक्रवारपासून बंद!; पुणेकरांना नाही मिळणार भाजीपाला
एमपीसी न्यूज – गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला, कांदा-बटाटा, फळे, केळी बाजार शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता भाजीपाला, फळे मिळणार नाही. कडधान्यावरच गुजराण करावी लागणार आहे.
पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजीपाला, फळे मुबलक असतानाही पुणेकर विनाकारण गर्दी करीत होते.
मार्केट यार्ड बंद करण्याची मागणी अडते असोसिएशनतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केटयार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.