Pune News : शर्जिल उस्मानीवर फौजदारी कारवाई करा ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

एमपीसी न्यूज : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी याने पुण्यात एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.

उत्तर प्रदेशच्या आझमगढचा मूळ रहिवासी असलेल्या उस्मानी याने पुण्यात भाषण करताना ‘आज का हिंदू समाज सड चुका है’ हे वक्तव्य संविधान विरोधी आहे. या वक्तव्यामुळे कोट्यवधी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. समाजात द्वेष पसरविण्याच्या हेतूने हे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संवैधानिक संस्थांविरोधातील हे वक्तव्य राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी शर्जिल विरोधात एफआयआर करून तात्काळ अटकेची कारवाई करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.