Pune News : एकत्र लढलो तर भाजपच्या फक्त 50 जागा निवडून येतील : जयंत पाटील

एमपीसी न्यूज : विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्रीत लढवल्यास भाजपचे 40 ते 50 जागा निवडून येतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्तवले.

पुण्यातील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे, नगरसेवक दीपक मानकर आदी उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला चार जागा मिळाल्या. त्याचा अर्थ महाविकास आघाडीवर लोकांनी विश्वास दाखविला आहे.

त्यामुळे भविष्यात आम्ही तीनही पक्ष एकत्र लढलो तर भाजपाचे 40 ते 50 जागा निवडून येतील, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.