Pune News : शिंदे फडणवीस सरकार फार काळ तग धरू शकणार नाही -दिलीप वळसे पाटील

एमपीसी न्यूज- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपा बाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,या राज्य सरकार मधील अंतर्गत घटना सर्वांना माहिती असून त्यामुळे हे सरकार फार काही काळ तग धरू ( Pune News) शकणार नाही.त्यामुळे दोन्ही पक्षातील आमदाराच्या भावनांवर एकमत होणे अवघड दिसत आहे.त्यामुळे हे सरकार जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल आणि हे सरकार एक दिवशी थांबेल ,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.
राज्याच्या कृषी मंत्र्यांना अजिबात गांभीर्य नाही.तसेच तो विषय त्यांना समजतो का नाही.त्याबाबत मला माहिती नाही.असे सांगत अब्दुल सत्तार यांना त्यांनी टोला लगावला.
Pimpri News : भाजपची मागणी म्हणजे वराती मागून घोडे- अजित गव्हाणे
भाजपचे नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला खंडणीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, अंतिम आठवड्याचा प्रस्ताव गृह विभागा संदर्भात असणार आहे.त्यावेळी मागील काही महिन्यात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याबाबत जाब विचारणार असून त्या विषयावर देखील आम्ही चर्चा करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
जुन्या पेन्शन मागणीसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्याचे पंचनामे झाले नाही.यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारच्या बाजूने पंचनामे झाले पाहिजे.मात्र ते होताना दिसत नसून कर्मचारी संपावर असल्याच राज्य सरकारकडून सांगितले जात आहे.हे काही योग्य नसून राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना कोणत्याही परिस्थितीत सानुग्रह अनुदान दिले पाहिजे.या मागणीसाठी आम्ही उद्या विधिमंडळात आवाज उठवणार ,असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र आणि राज्य सरकार केवळ घोषणा करणार आहे.या सरकारकडून अखेरच्या नागरिकापर्यंत विकास काम किंवा मदत पोहोचत नाही.सध्या केवळ जाहिरातबाजी सुरू असल्याच सांगत केंद्र आणि राज्य सरकारच्या ( Pune News) कारभारावर त्यांनी टीका केली.