Pune News : ‘मनु’वाद आणि ‘मनी’वादाच्या विरोधातील लढाई अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहील : बी. जी. कोळसे पाटील
एमपीसी न्यूज : अनेक मोदी येतील आणि जातील पण अखेरच्या श्वासापर्यंत ‘मनु’वाद आणि ‘मनी’वादाच्या विरोधातील लढाई सुरू राहील, असा निर्धार माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेत व्यक्त केला.
श्री गणेश कला क्रिडा रंगमंचात परिषदेत न्या.कोळसे पाटील म्हणाले, मनुवादी आणि मनीवादी एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. त्यापलीकडे जात एक नवी व्यवस्था आणली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे.
मोदींनी खूप काही केले म्हटले जाते. पण काही केले नसून पठाणकोटमध्ये मुंगी देखील जाऊ शकत नाहीत. मग तिथे दहशतवादी कसे आले, असा सवाल उपस्थित केला.
तसेच दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस होता, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.