Pune News : कोणाच्या बोलण्यामुळे आम्ही महाराष्ट्रद्रोही ठरत नाही : फडणवीस

एमपीसी न्यूज : शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, कोणाच्या बोलण्यामुळे आम्ही महाराष्ट्रद्रोही ठरत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनानेते  संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली.

कंगना राणावत यांच्या पाठीशी भाजपा उभी राहीली. त्यामुळे भाजपा महाराष्ट्रद्रोही आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम केेलेलं आहे.

यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला की आम्ही महाराष्ट्रद्रोही. मला अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना
गुजरातपेक्षा महाराष्ट्र एक नंबरवर होते. सर्वाधिक आर्थिक गुंतवणूक राज्यात आणली. गुजरातपेक्षा महाराष्ट्र प्रगत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.