Pune : रक्ताळलेली पत्रं लिहून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली मोदींच्या राजीनाम्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. पुणे शहर काॅंग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल आणि त्यांच्या 49 कार्यकर्त्यांनी ही पत्रे स्वतःच्या रक्ताने लिहिली आहेत.

मागील पाच वर्षात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुलवामा येथे झालेला हा हल्ला दुर्देवी असून त्याला सर्वस्वी मोदी सरकारला जबाबदार धरायला हवे. देशाचे सैनिक शहीद होत असताना तुमची 56 इंची छाती गेली कुठे? असा संतप्त सवालही यावेळी विचारण्यात आला.

सैन्यदलावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा बदला भारतीय सैन्य घेईलही. परंतु मोदी सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, हीच खरी शहिदांना श्रद्धांजली असेल, असेही या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.