Pune : पुण्याचे हक्काचे 16 टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे : माजी आमदार मोहन जोशी 

एमपीसी न्यूज  : पुणे शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे 16 टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. तसेच पुणेकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी गणरायाने पालकमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरासमोर भजन करून साकडे घातले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या पाण्याच्या नियोजनाचा खेळखंडोबा केला असून ,पालकमंत्री गिरिश बापट मात्र फक्त पाणीकपात करणे, हे एवढेच सूत्र धरून बसले आहेत. अशा शब्दात त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.