Pune : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग उभारणे हाच माझा निवडणूक अजेंडा -आढळराव पाटील

एमपीसी न्यूज – गेल्या पंधरा वर्षात अनेक विकासकामे केली. विकासाच्या जोरावर व मतदाराच्या पाठिंब्यामुळे मी नक्कीच चौकार मारणार, पुणे ते नाशिक रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली. तो मार्ग पूर्ण करून या मतदारसंघातील स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न सोडविणे, रस्त्याचे जाळे उभारणे हाच माझा निवडणुकीचा प्रमुख अजेंडा आहे, असे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. हडपसर मधील प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आढळराव बोलत होते.

यावेळी माजी आमदार महादेव बाबर, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, तानाजी लोणकर, अमोल हरपळे, संजय सातव, शिवसेना भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते होते.

खासदार आढळराव पाटील म्हणाले की, माझा शिरूर लोकसभा मतदार संघात पंधरा वर्षात नागरिकांशी सुसंवाद साधला असून सतत संपर्कात व विकासकामांमुळे माझा विजयाच्या चौकार अधिक मताधिक्य मिळवून होईल. विरोधक काहीही म्हणत असले तरी मी जातीपातीचं राजकारण करीत नाही, सर्व जातीधर्माचे लोक माझ्या सोबतीस आहेत.

मी सर्वांवर प्रेम करतो, विरोधक विनाकारण जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत. माझ्या विरूद्ध खोटे आरोप करत आहेत. शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करीत असलेतरी त्यांना यश मिळणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.