Pune : ….. अखेर राम कदम यांनी मागितली जाहीर माफी !
एमपीसी न्यूज- घाटकोपर येथे दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाकडून कदम यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. अखेर आज राम कदम यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून माफी मागितली आहे.
या माफीनाम्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता भगिनींची मने दुखावली. झाल्या प्रकरणाची मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनश्च माता भगिनींचा आदर करीत मी माफी मागत आहे.