Pune : राज्यात वारे बदलल्याचे केवळ शरद पवार यांनाच दिसताहेत -चंद्रकांत पाटील

सुमारे 1 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार; पाटील यांना विश्वास

एमपीसी न्यूज – राज्यात वारे बदलल्याचे केवळ एकट्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच दिसत असून त्यांच्या पाठीमागे ते कोणालाही दिसत नाही. अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. आपण सुमारे 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. कोथरूडमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून पाटील फिरत आहेत. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नरेंद्र मोदींनी एक पारदर्शक सरकार या देशाला दिले. त्यानंतर जनतेचा मतदान, राजकारण आणि राजकारण्यांवरचा विश्वास वाढत चालला आहे. आता महायुतीला 220 नव्हे तर 250 जागा मिळणार असल्याचे पाटील यांनी निक्षून सांगितले. माझ्या उमेदवारीबाबत खूप चर्चा झाल्या. आता त्या थांबल्या. मला सकाळपासूनच कोथरूडकरांचा मतदानासाठी उत्साह दिसतोय.

मी सायंकाळी 5 वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापूरला जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता मतदान करणार असल्याचे पाटील म्हणाले. तर, पंकजा मुंडे यांच्याबाबत धनंजय मुंडे यांनी एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणे बरोबर नाही. त्याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.