Pune : दिल्लीचा निकाल दिल्लीपुरता नव्हे, तर इतर राज्यातही हे घडू शकतं -शरद पवार

एमपीसी न्यूज – दिल्लीमध्ये पुन्हा एकदा ‘आम आदमी पार्टी’ने स्पष्ट बहुमत मिळवलं. यापूर्वी ‘आप’लं सरकार दिल्लीत पुन्हा येणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं होतं. याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पवार म्हणाले, दिल्लीचा निकाल दिल्लीपुरता नव्हे, तर इतर राज्यातही हे घडू शकतं.

यावेळी शरद पवार म्हणाले, दिल्लीचा निर्णय केवळ दिल्लीपुरता मर्यादित नाही तर, इतर राज्यातही हे होऊ शकतं. देशात नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविषयी चर्चा जी संसदेत ऐकतो. ते दहशती वातावरण आहे. ही प्रक्रिया आता सुरूच झाली असं नाही. अनेक राज्यात भाजप पराभव झाला, तो आता थांबेल असं वाटत नाही. आम्ही लोकांनी योग्य पर्याय दिला पाहिजे.

देशात आम्ही सर्व एकत्र बसून काम करू. आज लोकांना एका विचाराची कार्यक्रमाची अपेक्षा आहे. भाजप ही आपत्ती आहे. देशावरची हा निवडणूक निकाल लागला, यात आश्चर्य वाटत नाही. दिल्लीत सर्वजण केजरीवाल म्हणायचे, देशात सर्व ठिकाणी मोदी राज्य आहे. गेल्या वेळी आम्हला पर्याय योग्य वाटला म्हणून त्यांना केजरीवाल. लोकांनी काम बघून निवडले. केजरीवाल यांनी लाईट बिल,पाणीपट्टी, शिक्षण चांगले दिले. त्याचाच हा निकाली म्हणावा लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.