Pune – प्रेमविवाह मान्य नसलेल्या सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्मह्त्या

एमपीसी न्यूज – प्रेमविवाह मान्य नसलेल्या सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्मह्त्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.30) पहाटे साडेचारच्या दरम्यान वानवडी गाव येथील आबगाव वाडा येथे घडली.जयश्री विनोद काकडे (वय 34, रा. वानवडी गाव ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी गोरखनाथ आबनावे (वय 40, रा. कात्रज-कोंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरखनाथ यांची बहीण जयश्रीचा विनोद मारूती काकडे याच्याशी 2000 साली प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी घरचांच्या विरोधात जाऊन केलेला प्रेमविवाह जयश्रीच्या सासरच्या लोकांना मान्य नव्हता. लग्न झाल्यानंतर जयश्री सासरी नांदत असताना तिची सासू आणि नणंद यांनी मिळून जयश्रीचा शारिरीक आणि मानसिक छळ सुरू केला. एवढेच नाही तर जयश्रीच्या मुलाचा देखील त्या दोघी संभाळ करत नसत. सासू आणि ननंद या वेळोवेळी तिला शिव्या देत, मारहाण करत तसेच तिला तिचा स्वयपाक देखील वेगळा बनवायला लावत. अशाप्रकारे त्या दोघींनी तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. आणि अखेर या सर्व त्रासाला कंटाळून जयश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि स्वत:ला संपवून टाकले.

याप्रकरणी जयश्रीच्या सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.