Rathani news: रहाटणीचे माजी सरपंच गोविंदराव तांबे यांचे निधन
एमपीसी न्यूज – रहाटणी गावचे माजी सरपंच गोविंदराव बाजीराव तांबे (वय 85 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 20 एप्रिल) वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, पाच मुली, सूना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. पिंपरी- चिंचवड कुस्तीगीर संघाने नुकताच त्यांचा ‘ जीवन गौरव पुरस्कार2020’ देऊन गौरव केला होता.
पैलवान बाबासाहेब तांबे यांचे ते वडील होत.