Sanjay Raut : पाठींब्याबद्दल संजय राऊत यांनी मानले मित्रपक्षांचे आभार, ईडी कोठडीतूनच लिहिले पत्र

एमपीसी न्यूज – ईडीकडून अटक केल्यानंतर संजय राऊत यांना पाठिंबा जाहीर केलेल्या मित्र पक्षांना राऊत यांनी ईडीच्या कोठडीतून पत्र लिहून आभार मानले आहेत. हे आभार मानताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा उल्लेखही केला आहे.

 

संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. या ठिकाणाहूनच त्यांनी मित्रपक्षांसाठी एक पत्र लिहिल असून त्यात त्यांनी आभार मानले आहेत. ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि मित्र पक्षांनी राऊत यांना पाठिंबा दिला होता. ईडीकडून अटक झाल्यानंतर राहुल गांधींसह  काँग्रेसच्या इतर नेत्यांनी व्टिट करत संजय राऊत यांना पाठींबा जाहीर केला होता.

 

 

दरम्यान, आत्ता राऊतांनी जे पत्र लिहिल आहे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून लिहिल असून त्यात म्हंटले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांची कायमच शिकवण राहिली आहे की रडायच नाही लढायचं.या शिकवणुकीनुसार आम्ही काम करतो आहोत.पण जी कारवाई माझ्यावर झाली आहे त्याला सर्व मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.