Mumbai: शेतीसाठी सरकारने प्रभावी पाऊले टाकावीत – शरद पवार
कोरोनामुळे मानव, पशु,पक्षी, पिकपाणी, अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, राज्यातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद
एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट अतिशय गंभीर आहे. त्याचे परिणाम दिर्घकालीन होणार आहेत. कोरोनामुळे मानव, पशु,पक्षी, पिकपाणी, अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भिती व्यक्त करत केंद्र, राज्य सरकारने शेतीच्या दृष्टीने आणखी पाऊले टाकावीत. पॅकेज वाढवून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. तुम्हीही घराबाहेर पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.
शरद पवार यांनी आज (शुक्रवारी) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
#मानव, पशु,पक्षी, पिकपाणी, अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम
#कोरोनाचे संकट अतिशय गंभीर, परिणाम दिर्घकालीन
#केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा
#गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही
#सामाजिक अंतर ठेवा, सर्वांनी एकत्र लढावे
#सरकारने प्रभावी पाऊले टाकावीत
#शेतीच्या दृष्टीने आणखी पाऊले टाकावीत, पॅकेज पुरेसे नाही
#शेती, मत्स्य, दुग्ध व्यावसायावर परिणाम
#शेतक-यांना पीक कर्ज भरणे अशक्य
#पोलिसांनी धोरणात बदल करावा
# नागरिकांनी पोलिसांनाही मदत करावी
#हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी आणखीन मदत करावी