Grampanchayat election: राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून

एमपीसी न्यूज: पावसाचे प्रमाण कमी असले त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार, असं राज्य निवडणूक आयोगाने (Grampanchayat election) मागेच सांगितलं होते. त्यानुसार आता राज्यभरातील विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे.

त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली आहे. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Pimpri News : शैक्षणिक तक्रारींच्या निवारणासाठी आठवड्याला जनसभा घेण्याची रयत शिक्षण संस्थेची मागणी

त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत.(Grampanchayat election) नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येणार असून शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

 

नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबरला होणार आहे तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली.

 

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे –

नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75.

धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 2.

बुलढाणा: जळगाव (जामोद)- 1, संग्रामपूर- 1, नांदुरा- 1, चिखली- 3 व लोणार- 2.

अकोला: अकोट- 7 व बाळापूर- 1. वाशीम: कारंजा- 4.

अमरावती: धारणी- 1, तिवसा- 4, अमरावती- 1 व चांदुर रेल्वे- 1

यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 8. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 1, मुदखेड- 3, नायगाव (खैरगाव)- 4, लोहा- 5 कंधार- 4, मुखेड- 5 व देगलूर- 1.

हिंगोली: (औंढा नागनाथ)- 6.

परभणी: जिंतूर- 1व पालम- 4 नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17.

पुणे: जुन्नर- 38आंबेगाव- 18, खेड- 5 व भोर- 2.

अहमदनगर: अकोले- 45.

लातूर: अहमदपूर- 1.

सातारा: वाई- 1 व सातारा- 8. व

कोल्हापूर: कागल- 1

एकूण: 608

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.