Stay On Farm Law : सर्वाेच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

एमपीसी न्यूज – कृषी कायद्यांच्या अंमलबजाणीला सर्वाच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कायदा लागू होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वाच्च न्यायालयाने या कायद्यांवर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीला शेतकऱ्यांनी विरोध केला असून याबाबत योग्य आदेश दिला जाईल असे न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘शेतकरी कायद्यांची अंमलबजावणी थांबवा, नाहीतर आम्ही थांबवू’ असं म्हणत सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं होतं. त्यानंतर आज या तिन्ही कायद्यांना स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.