Pune : इलेक्ट्रिक व्हेईकलच्या रिट्रोफिटिंगवर हँड्स-ऑन प्रशिक्षणवर आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मिळवले कौशल्य

जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (आरएससीओई), विद्युत अभियांत्रिकी विभागाकडून आयोजन

एमपीसी न्यूज – जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (आरएससीओई), विद्युत अभियांत्रिकी विभागाकडून डीआयवायगुरुच्या सहकार्याने 6 ते 11 जानेवारी 2020 मध्ये  इलेक्ट्रीक व्हेईकलच्या रिट्रोफिटिंगवर आयएसओ सर्टिफाइड हँड्स-ऑन प्रशिक्षणवर विद्यार्थ्यांसाठी एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली. आधुनिक तंत्र, अभियांत्रिकी साधने आणि कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान प्राप्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या उद्देशाने रिट्रोफिट केलेले इलेक्ट्रिक वाहन आरएससीओ ताथवडे कॅम्पसला सुपूर्त केले.

आजकाल, बहुतांश वाहन कंपन्या इलेक्ट्रिक, क्लीनर आणि टिकाऊ पर्यायांकडे स्विच करण्याचे आश्वासन देतात. भारतातील वाहन क्षेत्रात एक ‘विद्युत’ क्रांती येत आहे. परंतु, वाहन कंपन्याना ऊर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून इलेक्ट्रिक ड्राईव्हसमध्ये संक्रमण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिभावान, योग्य कुशल अभियंत्यांची कमतरता आहे. यावर उपाय म्हणून विविध विभागांना बळकट करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

डीआयवायगुरू, न्यू दिल्ली आणि जेएसपीएमच्या आरएससीओई यांच्यातील हे संयुक्त सहकार्यांचे उद्दीष्ट मुख्यत: महाराष्ट्र आणि जवळपासच्या क्षेत्रातील ई-मोबिलिटी इकोसिस्टमला सहाय्य करणे, इतरांना इलेक्ट्रिक व्हेइकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सूक्ष्म उद्योजकता सुरू करण्यास सक्षम करणे, ऑपेक्स मॉडेलवर इलेक्ट्रिक बसचा ताफा सक्षम करण्यासाठी रिट्रोफिटिंग व्यवसाय सुरू करणे आणि मेक इन इंडिया मोहिमेला हातभार लावणे, असे आहे.

कार्यक्रमास संबोधित करताना प्रमुख पाहुणे प्रा. ए. के. भोसले (जेएसपीएम संचालक) म्हणाले, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनच्या 100 टक्के अंगीकारणेच्या धोरणांवर काम करणारे देशातील पहिल्या 10 राज्यातील आहे. यामुळे लोकही इलेक्ट्रिक वाहन घेण्यास प्रवृत्त होईल. वाहतूक व्यवस्थापन आणि प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यात मदत करेल. अशा कार्यशाळेचा परिचय हा एक यशस्वी ठरू शकतो.

यावेळी बोलताना आरएससीओईचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी असे सांगितले की अशा प्रकारच्या उत्पादनांची भारतासारख्या देशात आवश्यकता आहे. कारण येथे रहदारी ही एक मोठी समस्या आहे. सौर उर्जाद्वारे चालवल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रिकली चालविल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक वाहनासाठी लागणारी प्रचंड वायरिंग सेटअप कमी होईल. उत्तम दर्जाची, परवडणारी किंमत आणि पर्यावरणाला चांगल्या अशा सार्वजनिक वाहतुकीची आवश्यकता असणारी लोकसंख्या या प्रकल्पांना भारतामध्ये आधार देईल.

उद्घाटन सोहळ्यात डॉ. आर. एस. जोशी, (जेएसपीएमचे संचालक), डॉ. पी. पी. विटकर, (जेएसपीएमचे संचालक), प्रा. सुधीर भिलारे, (कॅम्पस डायरेक्टर, आरएससीओई), श्री. रवि सावंत, (इस्टेट व्यवस्थापक, आरएससीई), डॉ. ए. एस. देवस्थली, (उपाध्यक्ष, आरएससीओई), श्रीमती एन. डी. घोरपडे (यांत्रिकी विभाग, कार्यशाळा समन्वयक), कु. एस. वाय. तांबोळी (विद्युत विभाग, कार्यशाळा समन्वयक) विद्युत विभाग प्रमुख डॉ. एस. एल. चव्हाण यांनी विद्यार्थी स्वयंसेवक व डीआयवायगुरु यांच्या सहकार्याचे आभार मानले जेएसपीएम गटाचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत यांनी कार्यशाळेच्या आयोजन समितीच्या
प्रयत्नांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.